वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ | निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
वृक्ष संवर्धन योजना
नवीन रोप लावण्यापूर्वी वृक्ष मोठा होईपर्यंत आपण दत्तक घेतलेल्या वृक्षाची देखभाल संस्था करेल.
प्रसाद स्वरूप अन्नदान योजना
प्रत्येक महिन्याची संकष्टी चतुर्थी आणि माघी गणेशोत्सव अश्या दोन विभागात हि राबवली जाईल. प्रत्येक महिन्याची संकष्टी चतुर्थीला दर्शनाला येणाऱ्या भक्तांना खिचडी किंवा तत्सम उपवासाचा पदार्थ प्रसाद म्हणून दिला जाईल.
विशेष दिन स्वेच्छा अभिषेक
वार्षिक अभिषेक योजना : ह्या योजनेत एकदाच रुपये ३५०० ठेव देऊन पुढील सलग दहा वर्ष वर्षभरातील वैयक्तिक दृष्ट्या महत्वाच्या दिवशी किंवा विशिष्ठ दिवशी श्रीसिद्धिविनायकाचे चरणी आपल्या वतीने अथवा आपण उपस्थित राहिल्यास
अभिषेक
Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec Ut elit tellus, luctus nec
आंजर्ले गाव रत्नगिरी जिल्ह्यात समुद्र काठी उतार अक्षांश १७ ͒- ४२' आणि पूर्व ७३ ͒- ८' वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई - गोरेगांव - आंबेत - मंडणगड - दापोली - आंजर्ले अथवा मंडणगड - पालावणी - कांदिवली - वेळावी मार्गे आंजर्ले असे दोन रस्ते आहेत. पुणे, कोल्हापूर, कराड, हि गावे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली - अडखळ - आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे. आंजर्ले खाडीवरील पुलाचे काम मे २००३ मध्ये पूर्ण होऊन आता आंजर्ले गाव सागरी महामार्गाचा एक महत्वाचा टप्पा बनला आहे.
हे मंदिर डोंगरावर असल्याने त्यास कड्यावरील गणपती मंदिर असे नाव पडले असावे. सध्याच्या मंदिराच्या जागेवर एक मंदिर पुरातन काळापासून होते या त्याची पूजाअर्चा व व्यवस्थापन आंजर्ले गावातील नित्सुरे(वेधशाळा घराणे) या घराण्याकडे होती.
आंजर्ले गावाला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. सागर किनारी आणि खाडी काठची भरती – ओहोटीच्या वेळची जलक्रीडा पाहणे हा संस्मरणीय अनुभव आहे. सदाहरित वृळशारजीची शाल पांघरून अत्यंत नीरव वातावरणात गाव पहुडलेले असते. पक्षांच्या मंजुळ कुजणाने मूळच्या प्रसन्न वातावरणात आल्हादकारक भर पडते. मंदिराचे पांढरेशुभ्र कळस दूर अंतरावरूनच भक्तमंडळींना खुणावत असतात. गर्द झाडीत लपलेल्या मंदिराची मानवनिर्मित कलाकृती केवळ अनुपम आहे. पण या सगळ्या चराचराशी एकदां भावनिक तादात्म्य साधले की सकाळ – संध्याकाळच्या बदलत्या रंगानी रंगलेले मंदिर, चांदण्याच्या धूसर प्रकाशात आणि पौर्णिमेच्या सुधारसात स्नान करणारे मंदिर, पावसाळ्यातील सागराचेरौद्र तांडव आणि त्यावेळी धुवाधार पावसात सचैल स्नान करणारे मंदिर असे सौंदर्याचे परोपरीने अविष्कार केवळ रसिक मनालाच जाणवतात. दृक प्रत्ययापलीकडील आनंदभूमीत जाण्याची किमया,”हें तर देणे ईश्वराचे.”